Tuesday, March 25, 2008

"ती" आणि अश्रु - एक काव्य कथा


एकदा दोन अश्रु एकमेकांच्या प्रेमात पडले,
स्वप्नील तरंगात आकंठ बुडाले,ना कशाचे भान;
विसरले भूक - तहान;
आयुष्य भराच्या संगतीची,
घेतली त्यांनी आण;
आनंदाचे गाणे गात;
दोघे संगतीने राहत........

एक दिवस अचानक ........
काळlचे बांध फुटले,दु:खाचे महापूर लोटले;
आणि दु:खाच्या या सागरात;
एका अश्रुने कायमचे डोळे मिटले...........
दुस-याला जगणे नको झाले,
एक अश्रु गळुन पडला,
तुटून मात्र सखा गेला,
आक्रंदुन वेडा-पिसा झाला,
काय करावे सुचेना,
जीव द्यावासा वाटला जरी,
बाहेर पड़ता येईना,
पापण्याआड़ उभा राहून तो(अश्रु),
आता पुन्हा महापुराची वाट पाहू लागला............

एकदा मात्र .........
पापणी आड़ दडून त्या(अश्रु)ने पाहिले,
दूरवर असाच महापुर आला होता दु:खाचा ,काळोखाचा;
तेव्हा कळाले..........
आपला महापुर किती जीवघेणा होता,
मैफिलीतही "ती"ला एकटं करणारा होता,
त्या(अश्रु)ने आता ठरवलं....
नाही ..... आता जायचे नाही,
जिने आपल्याला डोळयात स्थान दिले,
"ती"ला एकटं सोडायचं नाही,
आपली संपलेली अधुरी कहाणी विसरायची,
"ती"ला जगायला मदत करायची,

तेव्हा पासून मित्रानो,............
आता"ती" रडत नाही,
कारण..
तो (अश्रु) "ती"ला सोडून कधीच जात नाही,
कितीही वादळं आली तरी,
फक्त पापण्याआड़ दडून पाहतो,
मनातल्या मनातच तो वाहतो,
आपल्या सखीला अजुन तो विसरला नाहीये,
पण आता त्या(अश्रु)ला
"ती"ला सोडायचं नाहीये,
स्वत:च्या सुखासाठी "ती"चं मन मोडायचं नाहीये......................
.....................................Suvarna B.

No comments: