
कधीतरी मग मी तुला आठवेल,
पण;तेव्हा वेळ निघून गेलेली असेल,
ना मी असेल ना माझी साथ ,
जेव्हा कोणाचाच नसेल तुझ्या हातात हात,
अश्रु दाटतील डोळयांत,
एकटाच राहशील सोहळयांत,
जेव्हा सगळे जग तुझ्यावर हसेल,
तेव्हा दव बिंदुसारखी ही आठवण,
तुला मोत्यासारखी भासेल,
जप नक्की जमले तर, ही आठवण...
हीच असेल तुझ्या आयुष्यातली एक साठवण....
............................Suvarna B
1 comment:
agadi sundar kavita, manala sparsh karun geli... keep it up..
Post a Comment